पुनीत बालन ग्रुपच्या पाठिंब्यामुळे सुवर्णपदक!
पुणे. दि.२१. ( प्रतिनिधी ): आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर देशाचे राष्ट्रगीत व तिरंगा परदेशात फडकाविण्यात आला.तो क्षण माझ्यासाठी सुवर्ण क्षण च आहे.
यासाठी माझ्या कुटुंबियांबरोबर मला पुनीत बालन सरांनीही तितकेच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. त्यामुळे मला हे सुवर्णपदक मिळवणे शक्य झाले,' असे सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले म्हणाली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनीत बालन ग्रुप च्या स्टार खेळाडू ऋतुजा भोसले हिने मिक्स डबल मध्ये हिंदुस्थान ला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याबद्दल ऋतुजा हिचा पुनीत बालन ग्रुप च्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि 'माणिकचंद ऑलिम्पिक'च्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल- बालन, ऋतुजा हिचे पती स्वप्नील गुगळे आणि आई नीता भोसले उपस्थित होते.
आगामी काळात ऑस्ट्रेलियन ओपनबरोबरच ऑलिम्पिक स्पर्धेची तयारीला आतापासूनच सुरूवात करणार आहे.प्रशिक्षकांकडून नेहमी योग्य मार्गदर्शन मिळत असून, आगामी ऑलिम्पिकचे ध्येय बाळगले असल्याचे ऋतुजा हिने सांगितले.
यावेळी बालन म्हणाले, ' ऋतुजाने मेडल जिंकून फक्त बालन ग्रुप व महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचे नाव उंचावले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.ऋतुजा सारख्या गुणी आणि कष्टाळू खेळाडूंना मदत करण्यास बालन ग्रुप सदैव पुढे असेल.